माणिकपुंज चे पाणी तालुक्यातच रोखून धरणे ही जबाबदारी सर्वांचीच-युवा फाउंडेशन
नांदगाव- प्रतिनिधी
नांदगाव शहरासह पूर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या माणिकपुंज धरणाचे पाणी पळवण्याचे जोरदार प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले आहेत,मात्र हे पाणी अडवण्यासाठी आता सर्वांनीच एकत्र येऊन प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे,असे आवाहन युवा फाउंडेशनचे संस्थापक सुमित सोनवणे यांनी केले आहे.
गिरणा धरणाचे पाणी मालेगाव व जळगाव जिल्ह्याला,नागासाक्या चे पाणी चांदवड तालुक्याला आणि आता माणिकपुंज धरणाचे पाणी चाळीसगाव तालुक्याला नेण्याचा घाट घातला जातोय,मात्र या धरणाच्या पाण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा संसार आता कुठे सुरळीत होऊ लागला आहे,त्यातच ही चर्चा झडू लागल्याने ह्या शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
प्रतिक्रिया-: सुमित सोनवणे युवा फाउंडेशन
जर घरात पाण्याचा हंडा भरलेला आहे,आणि कुणी पाणी मागितले तर एक ऐवजी तीन ग्लास पाणी देऊ,पण येथे हंड्याच्या तळाशी पाणी गेले आहे,मग पाणी देणार कुठून.? आणि पाणी मागणाऱ्यांनी ही याची तमा बाळगली पाहिजे.!
Comments
Post a Comment