Posts

Showing posts from December, 2025

नगरपरिषद मध्ये जे काही बरे वाईट घडेल त्याची जबाबदारी माझी नाही.- मदन हिरे

Image
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच येथे दीर्घकाळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आमदार सुहास कांदे यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झालाय. हा खूप मोठा बहुमान मला मिळालाय.मी त्याला (नगराध्यक्ष सागर हिरे ) काहीही शिकवणार नाही. त्यामुळे नगरपरिषद मध्ये या काळात जे काही बरे वाईट घडेल याची जबाबदारी माझी नाही.असे स्पष्ट मत लोकनियुक नगराध्यक्ष सागर हिरे यांचे वडील तथा या नगरपरिषद चे सेवानिवृत्त कर्मचारी मदन हिरे यांनी व्यक्त केले.        नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा नगरपरिषद आवारात आज पार पडला. त्यावेळी आमदार श्री. कांदे यांच्या खास आग्रहास्तव मदन हिरे यांना मनोगत मांडण्याचे सुचवण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा उसळला होता. मात्र जाणकार मंडळीमध्ये वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.     तर माजी आमदार अँड अनिल आहेर म्हणाले की, आमदार कांदे यांच्यामुळे तुम्हाला ही सुवर्णं संधी मिळाली आहे.जनतेची सेवा करून या संधीचे सोने करा. आणि सर्वात महत्वाचे आपल...

चिंचविहीरची सून कोपरगाव ची नगरसेविका तर निमगाव चे सागर हिरे नांदगावचे नगराध्यक्ष.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (nashik ) संतोष कांदे  कुठलेही पद नसताना आपण जेथे वास्तव्य करून असतो, तेथील गोरगरिबांची सेवा केली. कुणाच्याही हाकेस धावून गेलो तर स्थानिक, बाहेरचा हा मुद्दा गौण ठरतो अन राजसत्तेची वस्त्रे परिधान करण्यास मिळतात. हे नांदगाव व कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.      नांदगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी प्रचलित राजकारण्यांना मुख्य पदाच्या उमेदवारी पासून दूर ठेवत नव्या दमाच्या व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नांदगावकरांची अनेक छोट्या छोट्या गोष्टींची सेवा करत असलेल्या सागर हिरे यांना संधी दिली. हिरे हे मूळचे मालेगाव तालुक्यातील निमगाव चे मात्र जन्मभूमी निमगाव असली तरी कर्मभूमी नांदगाव च असल्याने गेल्या कित्येक वर्षाचा नांदगाव शहरातील वावर व आमदार कांदे यांच्यासोबतचा सहवास यामुळे नांदगाव करानी त्यांना परके मानले नाही. व थेट नगराध्यक्ष पदाच्या लढाईत त्यांना चांगल्या मतांनी संधी दिली आहे. आता आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली या संधीचे सोने करून राजकीय कारकीर्द घडवण्याची किमया त...

व्ही. एन. नाईक विद्यालयात स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक विद्यालयात लोकनेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.   यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्व. मुंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत व्यक्त केले. व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विश्वनाथ कांदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप चे जिल्हा नेते पुरुषोत्तम निकम (महाराज ) उपस्थित होते.    यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ही ना. मुंडे साहेबांबरोबरच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमास गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम भालेराव, शिक्षक बी. एस. पवार, एस. बी. जाधव, के. व्ही. शिंदे,आर. एस. चांदवडे,यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्योती गिते यांनी केले.

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिल्याच्या मुद्द्यावर सुहास अण्णांनी आवाज उठवावा - शेतकऱ्यांची मागणी

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावर शासनाने मदत जाहीर करून तिचे वाटप ही केले. मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी होती. त्यावर हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुहास कांदे यांनी चर्चा घडवून आणावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.      शासनाने जाहीर केलेली मदत अन प्रत्यक्ष हातात पडलेली रक्कम यात जमीन अस्मान चे अंतर होते. दोन मका बियाणे पॅकेट घ्यायचे ठरले तर साडे चार हजार रुपये लागतात. मग असे असताना एक एकर पीक नुकसानीचे अवघे साडे तीन हजार रुपये हातात पडले.आणि विशेष म्हणजे कागदपत्रे करण्यासाठी तीनशे ते साडे तीनशे रुपये लागले होते. आणि हा प्रकार म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर असा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून होत होती.    दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नांदगाव मतदार संघांचे आमदार सुहास कांदे यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी यापूर्वी अनेक प्रश्न सत्ताधारी असतानाही शासनाशी भांडून सभागृहात भक्कम बाजू मांडून मंजूर करून आणले आहेत...

विवाहेच्छुक महिला व पुरुषांनी नवचेतना अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा - सीईओ ओमकार पवार

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे नाशिक जिल्हा परिषद च्या माध्यमातून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नवचेतना अभियान अंतर्गत एकल महिला विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यात इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.      रविवार दि. १४ डिसेंबर रोजी नाशिक येथील जिल्हा परिषदच्या नूतन इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा संपन्न होणार आहे.यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.       नाशिक जिल्हा परिषद आयोजित राज्यात प्रथमच एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्व जातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा संपन्न होणार आहे. पुनर्विवाहासाठी इच्छुक असलेल्या  एकल महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी शेवटी केले ...