Posts

Showing posts from February, 2026

सिईओ ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून एकल वधू -वरांचा विवाह सोहळा संपन्न.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यातील  नागापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आंतरजातीय एकल विधुर महिला एकल पुरुष विवाह मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून, व प्रमुख उपस्थितीत आज नागापूर येथे पार पडला.         येथील एकल वर  नितीन गरुड व एकल वधू प्रतिभा धुराडे यांचा शुभविवाह ग्रामपंचायतीच्या आर्थिक व सामाजिक सहकार्याने पार पडला. नितीन गरुड हे एकल पुरुष असून त्यांच्या पत्नीचे साधारण दहा वर्षा पूर्वी निधन झाले होते तेव्हापासून ते एकल जीवन जगत होते तर वधू श्रीमती प्रमिला धुराडे यांचे पतीचे अपघाती निधन झाले होते.         लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी ही बाब हेरली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा एकल पणा कमी व्हावा यासाठी संबंधित चर्चा केली त्यानंतर त्यांना विवाहासाठी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार  यांची परवानगी घेऊन विवाहाचे नियोजन केले...

युवा विधितज्ज्ञ अँड. सचिन साळवे डॉ. आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे     भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यासाठीची उत्सव समिती कार्यकारिणी निवडण्यात आली. तीत अध्यक्षपदी अँड. सचिन साळवे यांची निवड करण्यात आली.   उर्वरित कर्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष -सनी कावळे, दिपक अंभोरे,कार्याध्यक्ष -सचिन संसारे, शंकरभाऊ लंगडे,खजिनदार,दत्तू जाधव,सचिव-रोहन बागुल, शुभम देहाडे,मिरवणूक प्रमुख- सागरअडकमोल, संतोष काकाळीज,सजावट प्रमुख-नितीन पगारे, पपू गरुड, सचिन निकम, बंडू जगताप,सलागार-अरुण साळवे, नागसेन चव्हाण,राजेश बनकर, मिलिंद खेडकर,अनिल जाधव, नितीन जाधव, मनोज चोपडे, सचिन निकम, विशाल निकम,विश्वास अहिरे,सचिन पगारे, सोनू जाधव,तानसेन जगताप,राजू गांगुर्डे शोभा ताई पगारे, कमल अहिरे,अक्काबाई सोनवणे यांचा समावेश आहे.

आटपाट नगरीचा थापाड्या राजा....!

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (nashik ) संतोष कांदे  एक आटपाट नगर होते.नगरातील सर्वजण सुखी आयुष्य जगत असताना, या नगराला एक मुखीया पाहिजे अशी सर्वांची भावना तयार झाली. अन मग नगरातील एक प्रतिभावान व्यक्ती शोधून त्याची निवड मुखीया म्हणून करण्यात आली. (क्रमशः ) 

नांदगाव बाजार समितीच्या व्यापारी गट संचालकपदी गोकुळ कोठारी यांची निवड.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव नाशिक -: संतोष कांदे     येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गटातील रिक्त झालेल्या संचालकपदी गोकुळ कोठारी यांची निवड करण्यात आली.       बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार सुहास कांदे,माजी आमदार अँड. अनिल आहेर व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या सूचनेनुसार घाटमाथ्यावरील बोलठाण गोकुळ कोठारी यांची निवड करण्यात आली.व्यापारी गटाचे यापूर्वीचे संचालक अमोल नावंदर यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार संचालक मंडळाने ठरावाद्वारे ही निवड केली.           या निवडीप्रसंगी उपस्थित राहिलेल्या समृद्धी बँकेच्या चेयरमन सौ.अंजुम सुहास कांदे, माजी आ.अँड.आहेर, श्री. कवडे यांचे हस्ते समितीने निर्माण केलेल्या शेतकरी निवास व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर यावेळी नांदगांव बाजार समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांसह नांदगांव चे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे , माजी पं.स.सभापती विलास आहेर , माजी संचालक विष्णू निकम , अनिल तात्या रिंढे...

नांदगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण महाराष्ट्र सुरक्षा दलाचा अधिकारी..!

Image
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  महाराष्ट्रातील आदिवासी समाज आता शिक्षणाच्या नव्या नव्या वाटा पादाक्रांत करू लागलाय. राज्य असो वा केंद्र शासनाच्या सर्वच सेवांमध्ये त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. ही भारताच्या नव्या निर्मितीची चाहूल आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तालुक्याच्या घाटमाथ्यावरील लोढरे या शेवटच्या टोकावरील गावातील आदिवासी तरुणाने थेट महाराष्ट्र सुरक्षा दलात एंट्री केल्याने तालुक्याच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सन २०१० मध्ये या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी कार्यालये,विमानतळ आदी गोष्टींची सुरक्षा करण्यासाठी या सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात येतो. मुंबई पोलीस कायदा १९५१ अंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून या दलातील अधिकाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे.        लोढरे ठाकर वाडी येथील रहिवासी साईनाथ बुधा पोकळे यांचे चिरंजीव पिंटू साईनाथ पोकळे याची मुंबई येथे एम.एस.एफ मध्ये निवड झाली. गावाकडील रानातली काम, काही दिवस स्थलांतरीत  ऊसतोडणी कामे करून सोबतच स्पर्धा परी...

कासारीत चर्चा सिंह आल्याची.... पाणी टंचाई चा गंभीर प्रश्न जळगाव बुद्रुक ला

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव नाशिक - संतोष कांदे  नांदगाव -: तालुक्यातील कासारी येथे चक्क सिंह अन त्याच्या सोबत बच्छडे ही आल्याची जोरदार अफ़वा पसरल्याने सायंकाळ नंतर जणू या परिसरात कर्फ्यू लागत असल्याचा आभास निर्माण होत आहे. मात्र यामुळे जळगाव बुद्रुकची पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.     काही दिवसापूर्वी जळगाव बुद्रुक येथे बिबट्याचे आगमन झाले भास्कर कांदे यांच्या दोन जनावरांचा फडशा पडल्यानंतर या बिबट्याने दुसऱ्याच दिवशी कासारी येथील संजय सानप यांच्या गायीचा फडशा पाडला. त्यानंतर कुठेही या बिबट्याचा संचार अथवा नुकसान केल्याची घटना घडली नाही. मात्र कासारी परिसरातील चांदेश्वरी मध्यम प्रकल्प जवळ चक्क सिंह आल्याची चर्चा जोरात सुरु आहे.      दरम्यान या प्रकल्पाच्या खालील भागात जळगाव बुद्रुकला पाणी पुरवठा करणारी उद्भव विहीर आहे. आणि या विहिरीवर जो विजपंप आहे तो चालू बंद करण्यासाठी कासारीच्या एका तरुणाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या भागात सिंह व त्याचे बच्छडे दिसून आल्याची जोरदार अफ़वा असल्याने सदर कर्मचारी या ठिकाणी जायला...

अजित दादांचा अपघात.... अन सोशल मीडियातल्या अफ़वा.!

Image
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा  नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा 'कामाचा माणूस' अशी सर्वदूर ओळख असलेले अजितदादा पवार यांचे विमान अपघातात त्यांच्याच कर्मभूमी बारामतीत दुःखद मृत्यू झाला. हे जगजाहीर असतानाही सोशल मीडियातून मात्र लोकभावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न विविध ए. आय.व्हिडीओ च्या माध्यमातून सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.       फेसबुक, इंस्टाग्राम, व अन्य सोशल माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करून जनमाणसात संभ्रम निर्माण केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही व्हिडिओ मधून अजितदादांना विमान कोसळण्याची माहिती मिळाली म्हणा किंवा शंका आली म्हणून त्यांनी पॅराशूट च्या साहाय्याने विमानातून उडी घेतली अन ते सुखरूप अज्ञातस्थळी पोहचले.काही गोष्टींचा खुलासा त्यांना करायचा असल्याने त्यांनी हे पाऊल उचल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.     दुसऱ्या काही पोस्टमध्ये विमानात सहा व्यक्ती बसल्या होत्या, तर मृत्यूदेह फक्त पाच च कसे.? यावर भाष्य करण्यात आले आहे. एका पोस्ट मध्ये व्यक्ती जळल्यानंतर त्याचे मृत शरीर फुगू कसे...